Wednesday, August 12, 2015

फुलराणी !!

फुलराणी !!
---------------------------- सचिन मेंडिस

बयची खित आली कि मन उदास होते. तिच्या मायेच्या स्पर्शासाठी जीव कासावीस होतो. कित्येक दिवसात बयची भेट झाली नव्हती. काल वेळ काढून बयला भेटायला गेलो. बय ओटीवर हिंदोळ्यात बसलेली होती. बयला पाहताच माझ्या चेहऱ्यावर आनंदाचा मोरपिसारा फुलला. बयसुद्धा माझ्या ओढीने आसुसलेली होती. मला पाहताच तिच्या डोळ्यात चमक आली. मी ओटीच्या पायऱ्या चढत असतना बय उठून पुढे आली. वार्धक्याने ती कमरेत वाकली होती पण नेहमीप्रमाणे थकलेली जाणवली नाही. मी जवळ जाताच बयने मला मिठी मारली. त्या स्वर्गीय स्पर्शाने माझ्या अस्तित्वाला एक वेगळा गंध आला. किती मायेचा होता स्पर्श तिचा. अनमोल स्पर्श, जसं तिच प्रेम. अनमोल, अलौकिक, जणू आभाळमाया !!

बयशी मनोसोक्त गप्पा झाल्या अन निघताना मी सहज एक हजाराची नोट बयच्या हातात टेकली. बयने झटकन माझा हात मागे केला अन म्हटलं 'माला कादो ओडे पैशे, मा दरी हात. जे ते देत्यात माला. अन कालुस नाळ पाड्लोते त्याये ७००-८०० रुपय आल्यात, तू त्या पैशा पोरांना कय हाड मा नावाने'. मी बयच्या डोळ्यात पाहिले अन मनोमन विचार करू लागलो, 'किती सुंदर बनवल्या आहेत ह्या 'बय' देवाने, वास्तल्याने ओतप्रोत भरलेल्या, कशाची तक्रार नाही कि काही मागण नाही.

मी निघणार तो बय आत जाऊन आली अन म्हणाली 'मा एक काम कर, आपली शिशीनशी पोरी बाळत जाले तिला दे'. मला काही कळण्याच्या आत बयने माझ्या हातात १०० रुपयाची नोट ठेवली. बयने नारळाच्या कमाईतील काही वाटा सत्कारणी लावला होता. मी गमतीने बयला विचारले, 'बय, नाळाये पैशे तू दरी जास्ती वेळ ऱ्या नाय वाटाते'. माझ्या प्रश्नाने बय सुरेख हसली. क्षणभर प्राजक्ताचा सडा ओटीभर फुलून आला. बयने उत्तर दिलं, 'ये शेवट्शे १०० रेलते, ते जाग्या लागले'. मी बयकडे आश्चर्याने पाहिले. माझ्या मनात बयच्या खर्चाचा मागोवा घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. नक्कीच हिने सवयीप्रमाणे दानधर्म केला असेल ह्याची मला कल्पना आली. 'बय, अजून का केला पैशा?' मी बयचे हात हातात घेत प्रश्न केला. 'आते, मे कडे फिरया जाशी या वयात?, १०० हुकुरवारे देवळात कशीन टाकिली, ३०० रुपय मजुराला देवोन आंगाळ साफ करोन घेतला, एक पिलोटा रोजानसा आप्रेशन केले तिला धाडला अन काल मावरेवाली आलती ते मावरयाय पैशे दिले'. बयने एका दमात हिशोब माझ्या पुढ्यात ठेवला.

मी बयला मिठीत घेतले अन ओटीवरून खाली उतरलो. विचार करू लागलो. हिच्याकडे देण्यासारखे किती आहे. हीच आयुष्य देण्यातच गेलं. ना तिची माया कधी आटली ना कधी तिच्या बटव्यातले पैसे. अन आपली नवीन पिढी. फक्त घेण्याची वृत्ती. आपण सुगंध वाटत नाहीत म्हणून फ़ुलत नाही. फक्त आपल्यापुरताच उमलणे हे काय फुलंण झालं. बय वाटत राहिली सुगंध म्हणून फ़ुलत गेली. कोमेजण तिच्या वाट्याला आलं नाही. घरी परतेपर्यंत बय अजून फ़ुलत गेली मनात अन तिचा सुगंध घरभर. 'किती सुंदर आहे आपली 'फुलराणी', मी आईला म्हटलं. 'कोण फुलराणी? आई म्हणाली. मी हसत म्हटलं ' माझ्या आईची आई'. लाल लुगाड्यातील माऊली.

काय जादू आहे नव्या पावसाची?

हलकेच खिडकी उघडली. आभाळ भरून आलं होत. थेंब थेंब पावसाच्या सरी धरतीकडे झेपावू पाहत होत्या. हवाहवासा मातीचा गंध पुन्हा खुणावू लागला होता. निवडणुकीचा क्षीण मागे टाकून मन पुन्हा टवटवीत अन प्रसन्न झाले होते. केळीच्या पानावर थबकलेले पावसाचे थेंब अल्लडपणे खुणावत होते. तिथे दूर झाडावर बसलेला कावळा आपले पंख फडफडवत अंगावरील पाणी उडवत होता. किती सुंदर दिसत होते त्याच्या अंगावरून उडणारे पाण्याचे तुषार, अवर्णनीय. अन केळीच्या पानावर चढलेली हिरवी चादर, किती मोहक अन सुंदर. मोबाईल मध्ये फोटो साठवण्याचा मोह आवरत नाही. काय जादू आहे नव्या पावसाची? एक अनामिक सुख, निसर्गाच्या वेगळ्या रूपाचं. हवाहवासा गारवा. क्षणभर खिडकीतून हात बाहेर काढून निसर्गाला ओंजळीत घ्यावे असे मनोमन वाटत आहे. अन आंब्याच्या झाडावर मागे राहिलेल्या त्या कैऱ्या, सहज एखादी हाती आली तर? 'कोलूम' असेल का घरात? घराबाहेर पाणी अन तोंडाला सुटलेले पाणी. पाऊसराजा, कैरीची फोड खाता खाता, लिखाणाला पुन्हा सूर गवसू दे, चिंब पावसात नवे शब्द सापडू दे !

इनोसेंट !

इनोसेंट !

तो गेला नाही रे तुझ्यातून...
जिवंत आहे तो तुझ्यात, तुझ्या डोळ्यात...
फक्त शोधता आले पाहिजे आपल्याला...
तुझा आवाज, तुझी साद...आठवण करून देते त्याची...
तो आपल्यात, आजूबाजूला असल्याची...!

जाते ते शरीर, राहते ती नजर...
राहतो तो आवाज, आपला वाटणारा....
फक्त डोळे बंद करून ऐकावं तुला...
किव्हा डोळे उघडून, तुझ्या डोळ्यात पाहावं त्याला....
मग कळेल, तो गेलाच नाही आपल्यातून.....
फक्त विरघळला आहे तुझ्यात,
समरस होवून गेलाय तो, तुझ्या अस्तित्वात...!

आपण थांबवायला हवा शोध त्याचा....
विश्वास ठेवला तर तुझ्या स्पर्शात मिळेल उब त्याची...
अन सापडेल तुझ्या श्वासात, त्याचा हवाहवासा सुगंध...
आपले अस्तित्व भारावून टाकणारा...
आपण उगाच शोधतो त्याला....
तो कायमचा गेला आहे असे समजून...
तो मात्र तुझ्यात आहे, अगदी तुझ्यात तू बनून जगणारा...
अगदी 'निरागसपणे' वावरणारा !

निस्सीम चाहता हो स्वतःचा,
तुझा शोध थांबेल त्याच्यासाठी...
अन तुला शोध लागेल तुझ्यातल्या,
हरवलेल्या 'इनोसेंटचा' !!

बोलकं कुटुंब !

बोलकं कुटुंब !

त्या दिवशी सलून मध्ये मी केस कापण्यासाठी वाट पाहत बसलो होतो. काचेच्या भिंतीतून बाहेरची धावपळ दृष्टीस पडत होती. इतक्यात एक जोडपं साधारण ३ वर्षाच्या मुलाला घेऊन सलून समोर आलं. नवरा बाहेर तिथेच थांबून राहिला अन ती बाई मुलाला घेऊन सलून मध्ये शिरली. ती बाई हातवारे करून न्हाव्याला काहीतरी विचारात होती. न्हाव्याने तिला बोटाने एक तास अजून वेळ लागेल असे खुणाविले अन ती बाई मुलाला घेऊन बाहेर पडली. मी काचेपलिकडे नजर टाकली. त्या नवरा-बायकोमध्ये बोटांच्या खुणेने काही संवाद सुरु होता अन तो लहानगा मुलगा त्या दोघाकडे निरागसपणे पाहत होता.

मला त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. मी न्हाव्याकडे चौकशी केली अन कळले की ते नवरा-बायको जन्मजात मुके अन बहिरे आहेत आणि दोघांनाही हाताच्या खुणेची भाषा समजत असल्याने त्यांचे उत्तम चालले आहे. मग मला त्या मुलाविषयी जाणून घ्याव्यासे वाटले अन समजले की त्या मुलाला बोलता अन ऐकता येत होते. मन विचार करू लागले, दैव किती निष्ठुर अन चांगलेही आहे. दोन जीवांना जन्मजात बोलण्या अन ऐकण्यापासून वंचित केले अन त्यांच्याच पोटी सुधृढ बाळ जन्माला घातले. पुढे अजून एक विचार मनात आला, कोणती संवादाची भाषा असेल त्या कुटुंबात? मुके-बहिरे पालक अन आई-वडिलांच्या आवाजासाठी आसुरलेल लेकरू. आपल्या तान्हुल्या बालकाचे पहिले बोल ऐकण्यासाठी त्यांचे कान आसुरले असतील का? की ती संवेदनाचं त्यांच्यात नसेल? अन त्या निरागस बालकाच काय जग असेल? सारे विश्व एकमेकांशी संवाद साधत असताना आपले आई-वडील असे अबोल हातवारे करीत जगणारे, किती गूढ वाटत असेल त्या कोवळ्या मनाला?

कधी वाटल नव्हत, असंही असेल जगात एखादे कुटुंब, जिथे आई गात असेल मुके अंगाईगीत अन तान्हुल्याच्या डोळ्यातील अश्रूतून कळत असेल आईला त्याचा शांत हंबरडा. खरंच आपल जग किती वेगळ आहे, किती सोपे आहे. फक्त ऐकायचं तेव्हा आपण कान नसल्यासारखे करतो अन जिथे बोलायला हवं, तिथे मुग गिळून गप्प बसतो. असो, त्या दिवशी आपल्या मूक-बधिर दुनियेतील ते बोलकं कुटुंब खूप सांगून गेलं.

सचिन मेंडिस

लालबुंद बदाम !!

लालबुंद बदाम !!

पाऊस अन बदाम ह्याचं जवळच नांत. पावसाळ्याच्या हंगामात बदामाचे झाड बहरून निघते. आमच्या अंगणात बदाम कधी रुजला ते ठाऊक नाही, परंतु पावसाळ्यात तो असा फुलून येतो की मन प्रसन्न होते. रोज सकाळी अंगणात झाडाखाली लालबुंद बदामाचा सडा पडलेला दिसून येतो, पण एखादे बदाम उचलून तोंडात टाकण्याची उर्मी अन वय दोघेही मागे पडलंय. आज सहजंच अंगणातल्या खडीवर पडलेल्या लालबुंद बदमाकडे लक्ष गेलं. मनात विचार आला, किती वर्ष त्याला असं टाळता येईल? ओटीवरून खाली उतरलो. अलगदपणे त्या बदामाला जमिनीवरून उचलून घेतलं. तेच बदाम जे मिळवण्यासाठी २५ वर्षा अगोदर कसरत करावी लागत असे. उजव्या हाताच्या नखाने बदामावर एक चीर करून मोठाला पापुद्रा बाहेर काढला. लालबुंद रसाने आतला भाग सजून आला होता. बदामाला नाकाजवळ नेले अन डोळे बंद करून चीर केलेल्या भागाजवळ दीर्घ श्वास घेतला. संपूर्ण शरीरात बदामी गंध दरवळला. एका हलक्या गंधाने सरळ माझ्या प्राथमिक शाळेतल्या वर्गात पोहचलो.

बोळींज वरून गोलप्यातल्या शेतातून पायपीट करून घोसाळी गावातील बदामे वेचत असल्याचा काळ जागा झाला अन बदामाच्या रसाने शर्टचा रंगलेला लाल खिसा डोळ्यासमोर आला. किती सुंदर होते ते दिवस. अगदी गोड अन मधुर, बदामाच्या आतल्या पांढऱ्या गोळ्यासारखे. घोसाळी गावात एका बावखालाच्या कडेला मोठे बदामचे झाड होते अन त्याच्या खाली म्हशीचा भलामोठा गोठा होता. साहजिकच काही बदामे शेणाच्या संपत्तीमधून उचलावी लागत असतं. बदामे उचलताना मन मागेपुढे होई, परंतु शेणाच्या दुर्गंधीवर बदामाचा हवाहवासा सुगंध मात करीत असे. त्या वेळेला वर्गात ५० पैशात ५ बदामे विकणाऱ्या मुलाचं मला भारी आकर्षण अन कुतुहूल वाटत असे. आमच्या जुन्या घराचा दरवाजा एखाद्या किल्य्याच्या दारासारखा होता. बदामाची साल खाऊन झाल्या नंतर उरलेली आठी आम्ही दाराच्या फटीत अलगद ठेवून दरवाजा बंद करून फोडत असू. अन मग फुटलेल्या आठीमधून भुगा झालेल्या बदामच्या पांढरया गोळ्याचा शोध घेऊन त्याचा मनमुराद आस्वाद होत असे.

आज स्वतच्या अंगणात बदामाचा सडा दुर्लक्षित पडलेला पाहून बदललेल्या काळाचे नवल वाटते. बदामाचा आकार, रंग, सुगंध सगळ काही तसंच आहे, फक्त वेळ-काळ बदलली आहे. काळ बदलला कि माणसाच्या गरजा अन मन ही किती बदलते. तसं पाहिलं तर आज ज्या गोष्टीसाठी आपल्या जीवाचा आटापिटा चालला आहे, त्या गोष्टी अन गरजाही भविष्याच्या पोटात कधी अदृश्य होतील ह्याचा नेम नाही. तूर्तास बदाम हुंगण्याचा मोह सोडवत नाही.

सचिन मेंडिस

न सांगता निघून गेलेले !!

न सांगता निघून गेलेले !!
                                           सचिन मेंडिस

मुलं वाट पाहत होती, पप्पा हॉस्पिटल मधून बरे होऊन घरी परत येण्याची. पण पप्पा न सांगता, मुलांना न भेटता निघून गेले. पप्पा ठीक आहेत, लवकरच घरी परत येतील अशा भाबड्या आशेने पप्पाच्या येण्याची आतुरतेने वाट पाहणारी ती निरागस बालके, पप्पाच्या वाटेवर डोळे लावून बसली होती. पण पप्पा काही आले नाही. पप्पाच्या जाण्याची बातमी आली. बातमी पण सरळ आली नाही, आढेवेढे घेत. घरी जमलेली नातलगांची गर्दी अन पाठून आलेला आईचा काळीज चिरणारा हंबरडा. कुणी म्हणाले पप्पा सिरियस आहेत, कुणी म्हणाले ऑपेरेशन सुरु आहे पण तो क्षणभराचा आधार. वसंताच्या चाहुलीने वृक्षाने पालवीची तयारी करावी अन दुर्दैवाने वृक्षाने पेट घ्यावा असा सगळा प्रकार. मोठ्या काळोखाची सुरुवात म्हणा.

आपल्याला हवीहवीशी वाटणारी, आपल्यात वावरणारी, आपली माणसे अशी न सांगता का निघून जातात? कोणतीही चाहूल लावून न देता. एक प्रचंड पोकळी निर्माण करून, तीही कधीही भरून न निघणारी. अन ती निरागस बालके, त्यांची कशी समजूत घालावी? त्यांच्या निष्पाप प्रश्नांची उत्तरे कशी शोधावी? गेल्या २-३ वर्षात अशा अनेक व्यक्ती न सांगता मनाला चटका लावून निघून गेल्या. आईच्या मायेला पारखी झालेली इवलीशी पाखरे पाहिली कि मन पिळवटून निघते. ज्या घरट्यात आई नाही, त्या घरट्यात पिलांची चिवचिव कोण ऐकत असेल? कि नियतीने अकाली लादलेल्या अनाथपणामुळे हरवली असेल त्यांची चिवचिव? जेव्हा १२-१३ वर्षाची छकुली ख्रिस्ताच्या समोर हात जोडून 'माझी आई कधी परत येणार'? असा प्रश्न ख्रिस्तासमोर मांडत असेल तेव्हा ख्रिस्त काय उत्तर देत असेल तिला? कि तोही निरुत्तर होत असेल आपल्यासारखा? अन देवाघरी गेलेली ती तरुण आई, देवराज्यातून आपल्या मुलांचे अश्रू पाहताना किती व्याकूळ होत असेल? किती तुटत असेल आतून.

न सांगता निघून गेलेल्या त्या व्यक्तीचे, मृत शरीर चर्चला नेण्यासाठी घरून उचलताना होणाऱ्या त्या आर्त किंकाळ्या अन ते हंबरडे. किती वेदना किती यातना त्या क्षणात. आयुष्य किती क्षणभंगुर आहे ह्याची जाणीव करून देणाऱ्या. अन प्रेतयात्रेबरोबर चालताना कानी पडणारे 'माती असशी मातीस मिळशी' हे गीत, किती त्रासदायक. संपूर्ण समाजाला रडू आणणारे. क्षणभर काळाला थांबवणारे. अलीकडेच निघून गेलेल्या त्या तरुणाची विधवा पत्नी जेव्हा घरच्यांना ओक्साबोक्शी रडून सांगते कि 'मला माझ्या नवऱ्याची खित आली आहे' तेव्हा त्या खितीला कोणते उत्तर असेल? कि तिलाही माहिती असेल कि फक्त खित परत परत येणार पण तो? तो परत येणार नाही. एक अंधारलेल काटेरी सत्य. काळजात खुपणार, डोळ्यांच्या पापण्या सदोदित ओल्या ठेवणार.

आपण कितीही म्हणो 'जो आवडतो देवाला, तोचि आवडे देवाला'. पण हे बोल अन समजुती क्षणभराच्या, वरवर फुंकर मारण्यासाठी. काळजाच्या वेदना, हृदयाच्या जखमा फक्त काळावर सोडून द्यायच्या. म्हणतात कि देवाच्या योजना ह्या मानवाच्या योजनेपेक्षा वेगळ्या असतात. पण अकाली निघून जाणाऱ्या व्यक्तींकरिता देवाच्या योजना मानवांच्या योजनेशी मिळत्याजुळत्या का नसाव्या? निदान मायेचे छत्र हरवलेल्या त्या चिमुरड्यांसाठी तरी.

सिंह गेला


तुझ्याशिवाय वाढदिवस

आज तुझा फोन येणार नाही. कारण सकाळची वेळ निघून गेली आहे. तुझा फोन नेहमी सकाळीच यायचा. बहुतेक वेळा ऑफिसला निघण्याअगोदर तू विश करायचास. आता सकाळ टळून गेलीय. सायंकाळ पर्यंत तुझ्या फोनची वाट पाहू का? असा वेडेपणा तुला आवडणार नाही पण आजचा दिवस असा वेडेपणा केला तर चालेल का? ह्या वयात वाढदिवसाचे कौतुक नाही रे पण तुझा ४ ऑगस्टचा वाढदिवस आणि माझा ६ ऑगस्टचा वाढदिवस. एकामागोमाग एक आपण वाढदिवस साजरे करायचो. एकदा तर तू म्हणाला होतास, 'आपण एकत्र मित्रासोबत वाढदिवस साजरा करू, अन आपण मोठ्या आनंदात एकत्र साजरा केला आपला वाढदिवस. सोबत आपला जॉन सुद्धा होता. आज सगळे मित्र आहेत, पण तू नाहीस. शुभेच्छा द्यायला. जो कुणी फोन करतो, तो फक्त तुझाच विषय काढतो. आनंद साजरा करायला कुणी तयार नाही रे. हे सर्व लिहायला वाटत नाही दादा, पण आतून येते. मनातल असं शब्दात व्यक्त केलं कि हलक वाटत. आज असाच हातात हात घेऊन आपण केक कापला असता तर किती छान वाटलं असतं. तुझ्याशिवाय वाढदिवस गोड वाटत नाही. सायंकाळ पर्यंत तुझ्या फोनची वाट पाहू का?

Dost RIP


हरवलेलं पाकीट

हरवलेलं पाकीट

कालची घटना. ऑफिसवरून लवकर घरी निघालो. जोगेश्वरी स्टेशनला जिन्यावरून उतरून पुढे चालू लागलो. बाजूला उभा असलेल्या व्यक्तीने पाठीवरील Bag ची चेन उघडी असल्याचे सांगितले. मी Bag पाठीवरून खाली काढली. Bag च्या बाहेरील खिशाची चेन पूर्णपणे उघडी होती. मी Bag मध्ये हात घातला अन मला धक्का बसला. माझ्या Bag मधून माझे पाकीट चोरण्यात आले होते. पाकिटात पैसे नव्हते परंतु डेबिट अन क्रेडीट कार्ड, आधार कार्ड, PAN कार्ड, कार आणि बाईकचे RC कार्ड, ड्रायविंग लायसेन्स, रेल्वेचा पास अशी महत्वाची ओरिजिनल डोक्यूमेंट त्यात होती. मी घरी फोन करून पाकीट चुकून घरात असल्यास चेक करायला सांगितले परंतु घरी काही ते सापडले नाही. मग मी निराश होऊन परतीच्या प्रवासाला निघालो. डेबिट अन क्रेडीट कार्ड लॉक करणे गरजेचे होते परंतु माझ्याकडे नंबर नसल्याने मी मोबाइलवरून माझ्या सिटी बँकेच्या खात्यावरून तत्काळ पैसे कॅथोलिक बँकेत वळते केले.

मिरारोड निघून गेल्यावर माझा मोबाईल वाजला. पलीकडून एका तरुणाचा आवाज आला. त्याने 'सचिन मेंडिस' बोलता का असे विचारले. मी 'हो' असे उत्तर दिले. माझे पाकीट त्याला अंधेरी स्टेशनच्या बाहेर सापडले आहे असे त्याने सांगितले अन अंधेरीला यायला सांगितले. माझे पाकीट परत करण्यासाठी तो पाउण तास अंधेरीला थांबणार होता ह्याचे मला कौतुक वाटले. मी तत्काळ भायंदरला उतरून चर्चगेट गाडी पकडली. त्या मुलाने त्याचे नाव 'अमर' असे सांगितले होते. मी मोबाईलमध्ये 'अमर अंधेरी' असा त्याचा नंबर सेव केला. माझ्या जीवात जीव आला होता. आता मला गाडी अंधेरीला कधी पोहचते असे झाले होते. मी ट्रेनमधून अमरला फोन लावला आणि पाकिटातील ओरिजिनल डोक्यूमेंट सुरक्षित असल्याची खात्री करून घेतली. ट्रेन अंधेरीला पोहोचली अन त्याचा पुन्हा फोन आला. मी कुठे पोहचलो ह्याची त्याने चौकशी केली. मी त्याला गाडी अंधेरी स्टेशनला लागल्याचे सांगितले, त्याने मला त्याच प्लेटफॉर्मवर सरकत्या जिन्याच्या खाली उभे राहायला सांगितले अन तो तिथेच येईल असे कळवले. मी स्टेशनला उतरून सरकत्या जिन्याच्या बाजूला उभा राहिलो. काही मिनिटाने एक काळा, शिडशिडीत २५ वर्षाचा तरुण माझ्या समोर आला अन त्याने 'सचिन सर' अशी हाक दिली. मी त्या तरुणाला मिठी मारली अन त्याचे आभार मानले. त्याने पाकीट माझ्या हातात सोपवले. माझ्या पाकिटातील विजिटिंग कार्डवर माझा मोबाईल नंबर होता त्यावरून त्याने मला संपर्क केला होता. त्याची चौकशी केली. कोणत्या तरी छोट्या कंपनीत तो ऑफिसबॉय म्हणून काम करीत होता अन काही कामानिमित्त तो अंधेरीला आला होता. मला त्या अशिक्षित तरुणाच्या प्रामाणिकपानाचे अन विशेषकरून परोपकाराचे कौतुक वाटले. मी खिशातून ५०० रुपयाची नोट काढून त्याच्या हातात ठेवली अन माझे विजिटिंग कार्ड त्याकडे दिले. त्याला उशीर झाला होता. त्याने 'मी निघतो' असे म्हटले अन तो पाठी फिरला. अमर च्या रूपाने मला एक सुखद अनुभव मिळाला होता.

रात्री घरी गेल्यावर घरच्यांना हि घटना सांगितली. ह्या दुनियेत अशी चांगली माणसे आहेत ह्याबद्दल आनंद व्यक्त केला. मनात आले अमरच्या मोबाईलवर फोन करून त्याच्या आईशी बोलावं अन तिच्या गुणी मुलाचे कौतुक कराव. मी अमरला फोन लावला. म्हटलं 'घरात कोण असते तुझ्या'. 'मी आणि माझा भाऊ, आम्ही दोघेचं असतो' अमरने उत्तर दिले. 'अन आई-बाबा, माझा पुढचा प्रश्न'. पुढून थंड उत्तर आले,' आई-बाबा लहानपणीच वारले'. मला खूप वाईट वाटले. आई-बाबाच्या मायेला पारखी झालेली हि अल्पशिक्षित मुले किती सुंदर आहेत, असे मनोमन वाटले. मी फोन ठेवण्या अगोदर अजून एक प्रश्न केला 'अमर, पाकीट सापडल्यावर तुला परत करावेसे का वाटले'? त्याने उत्तर दिले,' सर, काही महिन्यागोदर खोली पाहण्यासाठी मी विरारला आलो होतो, घरून निघाल्यावर मी ATM मधून महिन्याचा ७ हजार पगार काढून पाकिटात टाकला अन ट्रेन मध्ये चढलो. विरार स्टेशनाला उतरल्यावर लक्षात आले कि पाकीट चोरीला गेले आहे. पूर्ण महिन्याचा पगार क्षणात निघून गेला होता. मी खूप शोधाशोध केली परंतु पाकीट मिळाले नाही. मला पाकीट हरवल्याचे दुक्ख माहीत आहे, म्हणून तुमचे पाकीट सापडल्यावर मी तुम्हाला संपर्क केला'.

अमरचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झालो होतो. त्याच्या हरवलेल्या पाकिटाचे दुक्ख माझ्या सापडलेल्या पाकिटाच्या आनंदापेक्षा नक्कीच जास्त होते. मी त्याला त्याचे पाकीट परत मिळवून देऊ शकणार नव्हतो, परंतु माझ्या ओळखीने त्याच्यासाठी चांगली नोकरी तरी नक्कीच शोधू शकत होतो. मी त्याला वचन दिले, 'मित्रा, मी तुझे काम करतो'. मला त्याला पगाराने भरलेले नवीन पाकीट दयायचे आहे. सुरुवात केली आहे.

लग जा गले की कल हो ना हो !

लग जा गले की कल हो ना हो !

एक जवळचा मित्र अकाली निघून गेला. वाटलं शेवटचा भेटला होता तेव्हा त्याला मिठी मारायला हवी होती, अन सांगायला हवं होत, की तू किती चांगला आहेस, माझ्या आयुष्यात तू किती महत्वाचा आहेस. परंतु हस्तांदोलना पलीकडे कधी मिठीत घेण्याचा प्रश्न आला नाही. त्याचे शेवटचे दर्शन घेताना त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले अन केसावरून हात फिरवला. मन विचार करू लागले, हे तो अवतीभवती असताना का शक्य झाले नाही? मैत्रीत अन नात्यात ही सहजता का नसावी? कुठले हे अवघडलेपण? की नात्याला गृहीत धरण्याचा मनाचा स्वभाव? प्रेमाची सहजता, ऋणानुबंध, वास्तल्य्य, आपुलकी आपल्या कौटुंबिक अन मित्राच्या नात्यात का नसावी? आई-वडील, भाऊ-बहिण, मुलं-मुली, नातेवाईक, मित्र ह्यांना मिठीत घेण्यात संकोच का वाटत असावा? की प्रौढपणा निरागसता अन सहजता मारून टाकत असावा? की फक्त मोठा आघात झाल्यावर एकमेकांना मिठीत घेण्याची गरज भासावी.

माझ्या पत्नीच्या मामाकडच्या 'बय'कडे गेलो की ती पहिली मला मिठीत घेते अन हलकेच गालावर 'गोका' घेते. प्रेम व्यक्त करण्याचा किती सोपा परंतु प्रभावी प्रकार. जी गोष्ट लाखो शब्दात मांडता येणार नाही, ती एका मिठीत व्यक्त होते. देवाने गोष्टी किती सोप्या बनवून ठेवल्या आहेत. जवळचा मित्र जेव्हा अकाली गेला तेव्हा इतर मित्रांनी एकमेकांना आलिंगन देऊन सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. शोका प्रसंगी येणारी ही सहजता आपल्याला दैनदिन जीवनात का आणता येत नसावी? जीवन हे किती क्षणभंगुर आहे, ह्याचा अनुभव आपण अलीकडेच घेतलेला आहे. म्हणून आपल्या सर्व प्रिय व्यक्तींना भेटून सांगावेसे वाटते, 'लग जा गले की कल हो ना हो' !

Monday, April 20, 2015

Vijay


Haayku


Cross


Toran


Mother


Article in Lokprabha


हिंदी भाषा में कादोडी काव्य !

Sachin Mendes2:57pm Jan 6
हिंदी भाषा में कादोडी काव्य !
-------------------------------

बैल थका तो रहाट रुका !
रहाट रुका तो हिपना तापा !

हिपना तापा तो मोटार लावा !
मोटार लावा पण बान्ना ना वाळा !

बान्ना ना वाळा तो पाणी फुटा !
पाणी फुटा तो बाजुका भाग भीगा !

बाजुका भाग भीगा तो मरीदादय ओरडा !
'पोरा, तेरे पोटपे नांगर वाया' !

इस प्रकार

पोटपे नांगर भी वाया और पाणी भी गया वाया !
उपर से मरीदादय का फुकटका बोलणा भी खाया !

निग्रो कोपात !!

निग्रो कोपात !!

त्या दिवशी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी सायकल घेऊन मी बोळींज सोपारा रस्त्यावरून निघालो होतो. रस्त्यात थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या शेजारी दोन आफ्रिकन निग्रो व्यक्ती रस्त्याशेजारी गप्पा मारताना आढळले. गेली अनेक वर्षे ते तिथे भाड्याच्या बंगल्यात वास्तव्यास होते अन कधीतरी चर्चमध्ये इंग्रजी मिस्साच्या वेळी त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा योग आला होता. मी सहज सायकल थांबवून त्यांना विचारले, 'हाव आर यु फ्रेंड्स? आप को हिंदी भाषा आती है क्या?'. त्यावर त्यातील एक निग्रो बोलला, 'कोपात, हिंदी भी आती है और कादोडी पण आमाला बोलता येते'. मी अवाक झालो. निग्रो अन चक्क कादोडीत संभाषण. त्याने मला नाव विचारले. 'तुवा नाव का', मी त्याला 'सचिन मेंडीस' असे नाव सांगितले अन जवळच राहतो अशी माहिती दिली. मी त्यांना त्यांची नावे विचारली. एकाचे नाव 'जेम्स ओडुम्बे' अन दुसऱ्याचे 'टोनी ओडुम्बे' अशी नावे त्यांनी सांगितली. दोन्ही भाऊ मुळचे केनियाचे. मुंबईतून आफ्रिकन देशात ते तयार कपडे निर्यात करण्याचा व्यवसाय करीत होते. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी येथील निसर्ग सौदर्य, कुपारी संस्कृती अन समाजजीवन ह्यांची भरभरून स्तुती केली अन काही कुपारी मित्रांची नावे सांगितली ज्यांच्याकडून ते कादोडी भाषा शिकले होते. पण त्यांनी सांगितलेल्या एकही व्यक्तीला मी ओळखले नाही.

गप्पा करीत करीत आम्ही त्यांच्या बंगल्याच्या गेटपाशी पोहचलो. गेटच्या आत एक निग्रो बाई वालच्या शेंगा तोडत होती. जेम्सने तिला हाक मारली. बहुतेक ती त्याची बायको असावी. कमरेची पिशवी सावरत ती गेटपाशी आली. जेम्सने आफ्रिकन भाषेत तिला काही सांगितले ज्यात 'फ्रेंड' हाच शब्द तेवढा मला कळला. तिने माझ्याकडे स्मितहास्य केले अन म्हटले,' कुण्या, शा घेवोन जा'. तिचे ते शब्द ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. मी 'नाही, आभारी' असे तिला म्हटले. तिच्या कमरेच्या पिशवीतील वालाच्या शेंगा पाहून मी कुतूहलाने तिला विचारले, 'डू यु लाइक दिज वेजीटेबल्स?' त्यावर ती म्हणाली,' वालायो हिंगो, जाम टेस्टी'. मागून जेम्स म्हणाला,'काळ्या रवयसा वांगा घायला तर कोपात का खायदा का'. त्यांचे अस्सल कुपारीपण पाहून मला काही सुचेनासे झाले. माझी उत्सुकता आता शिगेला पोहचली होती. मूळ कुपारी माणूस हक्काची कादोडी भाषा मागे टाकत असताना अशा परक्या लोकांना त्यांच्या १५ वर्षाच्या वास्तव्यात इतके कुपारीपण यावे हे नक्कीच कौतुकास्पद होते.

मी त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील एकंदर फोटो पाहून घरात ख्रिस्ती वातावरण असल्याचे आढळले. मी सोफ्यावर बसणार तितक्यात एक म्हातारी निग्रो बाई हातात एक लहान मुलं घेऊन बाहेर आली. 'ई आम्शी बय' टोनीने मला तिची माहिती दिली. पूर्ण पांढरे झालेल्या झिपरी केसांच्या त्या म्हातारीला तांबडे लुगडे नेसले तर कसे दिसेल असे उगाचंच त्या वेळी माझ्या मनात आले. ती म्हातारी बाई त्या लहान मुलाला घेऊन ओटीवरच्या झोपल्यात बसली अन तिने 'येला तू गाये, देला तू दूध' हे गाणे घेतले. तेवढ्यात जेम्सच्या बायकोने सासूला हाक मारून 'उठ माळ्या सांदाला' गीत घ्यायला सांगितले. मला मी स्वप्न वैगेरे पाहतोय कि काय असे क्षणभर वाटू लागले. काही वेळ सोफ्यात बसेतो मला अजून एक आश्चर्याचा धक्का बसला. हातात प्लेट घेऊन आतमधून एक स्त्री बाहेर आली अन तिने माझ्या पुढ्यात 'तळणाच्या रोट्या' ठेवल्या. टोनीने ती त्याची बायको असल्याचे मला सांगितले अन अनेक कुपारी रेसिपी तिला जमत असल्याची सुग्रास माहिती दिली. पुढ्यात ठेवलेली गरम कुरकुरीत रोटी तोंडात टाकीत असताना मला त्या 'तळणाच्या रोट्या' आफ्रिकेतील केनिया, झाम्बिया, सोमालिया, इथोपिया येथे एक्स्पोर्ट करण्याची भन्नाट कल्पना सुचली. टोनीच्या बायकोची कुणीतरी कुपारी मैत्रीण होती तिने तिला ती कुपारी रेसिपी दिल्याची कुरकुरीत माहिती मला टोनीने दिली. 'संध्याकाळच्या वेळेला रोट्या कशा? असा प्रश्न मी टोनीच्या बायकोला विचारला तर तिने कादोडीत माझी विकेट घेतली. ती म्हणाली,' हाकोटे पीठ घायलोतो, आते आलो, सून कमीजास्ती जाला वाटते'. मला जणू शॉक बसला होता.

मी रोटी खात खात जागेवरून उठलो अन मोबाईलमध्ये फोटो घेऊन त्यांचा निरोप घेतला. गेटवर एक पाववाला जोरात सायकलची बेल वाजवत होता. बराच वेळ तो बेल वाजवत असल्याने त्याच्या कर्कश बेलने माझे कान भरून आले. मी त्याला काही बोलणार इतक्यात मला माझ्या बायकोची हाक ऐकू आली. 'सचिन, कते पासून अलार्म वाजाते, मोबाइल स्नुज कर'. मी झोपेतून धाडकन जागा झालो अन बिछान्यावर बसलो. सकाळी सकाळी मला ते विचित्र 'निग्रो' स्वप्न पडले होते. मी त्या स्वप्नाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला पण काही करून मला त्याचा अर्थ लागला नाही. नंतर चहा पीत असताना मला टोनीच्या बायकोने पुढ्यात ठेवलेली कुरकुरीत रोटी आठवली अन मी गालातल्या गालात हसत झाम्बियामध्ये रोटी एक्स्पोर्ट करण्याचे स्वप्न पाहू लागलो.

फुलराणी !!

फुलराणी !!


 बयची खित आली कि मन उदास होते. तिच्या मायेच्या स्पर्शासाठी जीव कासावीस होतो. कित्येक दिवसात बयची भेट झाली नव्हती. काल वेळ काढून बयला भेटायला गेलो. बय ओटीवर हिंदोळ्यात बसलेली होती. बयला पाहताच माझ्या चेहऱ्यावर आनंदाचा मोरपिसारा फुलला. बयसुद्धा माझ्या ओढीने आसुसलेली होती. मला पाहताच तिच्या डोळ्यात चमक आली. मी ओटीच्या पायऱ्या चढत असतना बय उठून पुढे आली. वार्धक्याने ती कमरेत वाकली होती पण नेहमीप्रमाणे थकलेली जाणवली नाही. मी जवळ जाताच बयने मला मिठी मारली. त्या स्वर्गीय स्पर्शाने माझ्या अस्तित्वाला एक वेगळा गंध आला. किती मायेचा होता स्पर्श तिचा. अनमोल स्पर्श, जसं तिच प्रेम. अनमोल, अलौकिक, जणू आभाळमाया !!

बयशी मनोसोक्त गप्पा झाल्या अन निघताना मी सहज एक हजाराची नोट बयच्या हातात टेकली. बयने झटकन माझा हात मागे केला अन म्हटलं 'माला कादो ओडे पैशे, मा दरी हात. जे ते देत्यात माला. अन कालुस नाळ पाड्लोते त्याये ७००-८०० रुपय आल्यात, तू त्या पैशा पोरांना कय हाड मा नावाने'. मी बयच्या डोळ्यात पाहिले अन मनोमन विचार करू लागलो, 'किती सुंदर बनवल्या आहेत ह्या 'बय' देवाने, वास्तल्याने ओतप्रोत भरलेल्या, कशाची तक्रार नाही कि काही मागण नाही.

मी निघणार तो बय आत जाऊन आली अन म्हणाली 'मा एक काम कर, आपली शिशीनशी पोरी बाळत जाले तिला दे'. मला काही कळण्याच्या आत बयने माझ्या हातात १०० रुपयाची नोट ठेवली. बयने नारळाच्या कमाईतील काही वाटा सत्कारणी लावला होता. मी गमतीने बयला विचारले, 'बय, नाळाये पैशे तू दरी जास्ती वेळ ऱ्या नाय वाटाते'. माझ्या प्रश्नाने बय सुरेख हसली. क्षणभर प्राजक्ताचा सडा ओटीभर फुलून आला. बयने उत्तर दिलं, 'ये शेवट्शे १०० रेलते, ते जाग्या लागले'. मी बयकडे आश्चर्याने पाहिले. माझ्या मनात बयच्या खर्चाचा मागोवा घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. नक्कीच हिने सवयीप्रमाणे दानधर्म केला असेल ह्याची मला कल्पना आली. 'बय, अजून का केला पैशा?' मी बयचे हात हातात घेत प्रश्न केला. 'आते, मे कडे फिरया जाशी या वयात?, १०० हुकुरवारे देवळात कशीन टाकिली, ३०० रुपय मजुराला देवोन आंगाळ साफ करोन घेतला, एक पिलोटा रोजानसा आप्रेशन केले तिला धाडला अन काल मावरेवाली आलती ते मावरयाय पैशे दिले'. बयने एका दमात हिशोब माझ्या पुढ्यात ठेवला.

मी बयला मिठीत घेतले अन ओटीवरून खाली उतरलो. विचार करू लागलो. हिच्याकडे देण्यासारखे किती आहे. हीच आयुष्य देण्यातच गेलं. ना तिची माया कधी आटली ना कधी तिच्या बटव्यातले पैसे. अन आपली नवीन पिढी. फक्त घेण्याची वृत्ती. आपण सुगंध वाटत नाहीत म्हणून फ़ुलत नाही. फक्त आपल्यापुरताच उमलणे हे काय फुलंण झालं. बय वाटत राहिली सुगंध म्हणून फ़ुलत गेली. कोमेजण तिच्या वाट्याला आलं नाही. घरी परतेपर्यंत बय अजून फ़ुलत गेली मनात अन तिचा सुगंध घरभर. 'किती सुंदर आहे आपली 'फुलराणी', मी आईला म्हटलं. 'कोण फुलराणी? आई म्हणाली. मी हसत म्हटलं ' माझ्या आईची आई'. लाल लुगाड्यातील माऊली.

Monday, February 9, 2015

चिल्लर


आज सकाळी कामावर निघायला उशीर झाला अन घाईत निघाल्याने खिशात पैसे घेण्याचे विसरून गेलो. उशीर झाल्याने नेहमीची ७.१५ ची ट्रेन आज मिस झाली. स्टेशनला पोहोचल्यावर खिशात पैसे न घेतल्याची जाणीव झाली. नशिबाने ट्रेनचा पास माझ्या नेहमीच्या बॅंगमध्ये असल्याने तशी जास्त धास्ती नव्हती परंतु जोगेश्वरी स्टेशन वरून ऑफिसला जाण्यासाठी शेअर रिक्षाचे ९ रुपये हाती असणे गरजेचे होते. नेहमीची ट्रेन मिस झाल्याने आजूबाजूच्या गर्दीत १०-२० रुपये कुणाकडून उसने घेण्यासारखे कुणी हक्काचे नव्हते. मी सहज म्हणून बॅंगच्या एका खिशात हातात हात घातला अन त्यात काही चिल्लर मला दिसली. मी खिशात हात घालून चिल्लर वर काढली तर त्यात एक ५ रुपयाचे नाणे अन बाकी १ रुपयाची चिल्लर मला दिसली. ५ रुपयाचे नाणे पाहून मला खूप हायसे वाटले.

जोगेश्वरी स्टेशनला ट्रेन मधून उतरून मी ब्रिजवर चढलो. रिक्षात बसण्यापूर्वी चिल्लर मोजावी म्हणून ब्रिजवर चालता चालता मी ती चिल्लर बॅंगमधून बाहेर काढायला गेलो अन दुर्दैव माझे की ५ रुपयाचे नाणे अन बाकी २-३ कॉईन माझ्या हातातून खाली निसटले. मला काही कळायच्या आत हातातील ५ रुपयाचे नाणे घरंगळत ब्रिजच्या खाली असलेल्या केबिनच्या छतावर जाऊन पडले. दुष्काळात तेरावा महिना जे काही सांगतात तसे माझ्या बाबतीत त्या क्षणाला घडत होते. जोगेश्वरी पूर्वेला स्टेशन जवळ ATM नसल्याने आज पायी जावे लागेल कि काय असे क्षणभर माझ्या मनात आले. मी हातात उरलेले कॉईन मोजू लागलो अन सुखद धक्का बसला. २ रुपयांची ३ अन १ रुपयांची ४ नाणी असे एकूण १० रुपये माझ्या मुठीत होते. मला क्षणभर 'दुनिया मुठ्ठी में' वाटू लागले. बागच्या खिशात अनेक दिवस अडगळीत पडलेली चिल्लर आज कामी आली होती. ज्या ५ रुपयाच्या नाण्यावर विश्वास ठेऊन मी विरारहून निघालो होतो त्त्यानेही ऐन वेळेला दगा दिला होता.

आयुष्याचं पण असंच असते नाही? मोठ्या नोटासारखी भासणारी श्रीमंत, प्रतिष्टीत, वलयांकित माणसे आपल्याला हवीहविसी वाटतात. त्यांच्या सहवासात आपला उद्धार होईल असे मनोमन वाटते. सुंदर, चकाचक दिसणारी, उंची वस्त्रे परिधान करणारी ही मोठी माणसे संकटात आपल्याकरिता पटकन धावून येतील असे वाटते. दुसऱ्या बाजूने विचार करता पैशाने गरीब, चर्चेत नसलेली, बिनचेहऱ्याची माणसे आपल्या आयुष्यात असूनही तशी आपल्या खिजगणतीतही नसतात. आपल्या दृष्टीने ती चिल्लर असल्याने त्यांच्या असण्याची, त्यांच्या जगण्याची आपण योग्य ती दखल घेत नाही, त्यांना पुरेसा वेळ अन सन्मान देत नाहीत. पण वास्तव काय आहे? अडीअडचणीला कोण धावून येतात? मोठ्या नोटासारखी भासणारी श्रीमंत, प्रतिष्टीत, वलयांकित माणसे कि पैशाने गरीब, चर्चेत नसलेली, बिनचेहऱ्याची चिल्लर माणसे? वर नमूद केलेल्या एका घटनेने एक शाश्वत वास्तव पुन्हा अधोरेखित केलं होत अन ते म्हणजे नाती अन मैत्री जोडताना श्रीमंत, प्रतिष्टीत, वलयांकित ह्या 'दिखाऊ' निकषावर न भाळता, निस्वार्थीपणे अडीअडचणीला धावुन येणारी चिल्लर पण 'टिकाऊ' बिनचेहऱ्याची माणसे आयुष्याच्या एका खिशात जपणे गरजेच आहे. छोटी असली तरीही तीच खरी नाती जपतात.

पुरस्कार

प्रसिद्ध साहित्यिक 'दुमा लुद्रिक' ह्यांना मानाचा 'शिमा कुरेल' पुरस्कार जाहीर !

१९७० च्या दशकात क्रांतिकारी लिखाण करून कुपारी साहित्यात खळबळ माजवणारे प्रसिद्ध साहित्यिक दुमा लुद्रिक ह्यांच्या 'तांबडा धान' ह्या कादंबरीला मानाचा 'शिमा कुरेल' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १९७० च्या दशकात त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकाने कुपारी वाचकांना मोहीनी घातली होती. 'मोडलेलो मांडव' ही त्यांची कादंबरी बेधडक लिखाणामुळे त्या काळी भलतीच गाजली होती. 'मिन्गरसा दार', 'दापुड्सो हिंदाळो', 'माटुंगा गेलो ते', 'आडसळ' ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके अजूनही लोकांच्या स्मरणात आहेत. 'माटुंगा गेलो ते' ह्या पुस्तकातील 'पेद्रू अण्णा' ह्या पात्रामुळे त्या काळी वाद निर्माण होऊन वसई सेशन कोर्टाने त्या पुस्तकावर बंदी आणली होती, जी पुढे मुंबई हायकोर्टाने मागे घेतली. १९८० साली त्यांनी लिहिलेल्या 'फरसुल्या' ह्या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा साहित्यभूषण पुरस्कार लाभला होता. ह्या दीर्घकविता संग्रहात त्यांनी अठवरा राहिलेल्या फरसुल्या ह्या व्यक्तीरेखेचे करुण चित्रण केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी अलीकडे लिहिलेल्या 'आय सो नवरो' ह्या नाटकावर दक्षिणेत मनिरत्नम ह्यांनी 'आय सो हसबंड' हा चित्रपट बनवण्याचे नुकताच घोषित केले आहे.

प्रवाहाविरुद्ध विचार मांडणी व वास्तव काळाला अभिप्रेत लेखन ह्या गुणांमुळे दुमा लुद्रिक ह्यांनी कुपारी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आगामी काळात मौज प्रकाशन तर्फे त्यांचा 'हिपना तापला' अन 'तू बाबा डोखा' हे दोन पुस्तके प्रकाशित होणार आहेत.येत्या रविवारी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अन विचारवंत 'अतू पिरेल' ह्यांच्या हस्ते ओलांडा येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ह्यावेळी 'गावठी ताता' ह्या मनोरंजक नाटकाचे आयोजन केले आहे.

Monday, February 2, 2015

Naahi....!!


पानगळ

कधी काळी बहरलेली
झाडावरील पाने
आज शुष्क होऊन
खाली कोसळत असतात !!

पुन्हा बहरण्यासाठी की
एक जीवनाचे सत्य म्हणून
माहित नाही !!

ही अनामिक पानगळ
अन लांब गेलेल्या सावल्या
डोळ्यासमोर निष्पर्ण होते
एक फांदी न फांदी !!

बहरताना स्व:तात गुंतलेल्या फांद्या
आज विषण्ण, एकाकी
सांत्वन करायला फांदीवर
एक चिटपाखरू नाही !!

डोळ्यादेखत होते
ही जीवघेणी पानगळ
वावटळीत सापडलेली पाने
अंगणभर विखुरतात
मनही विखुरते पानांनसोबत !!

विखुरलेल्या पानांचा सडा
एकत्र केला जातो कोपरयात
अन लावली जाते
हलकेच काडेपेटी
फांदीच्या डोळ्यादेखत !!

मी स्तब्ध, मुकाटपणे
पाहतो नवी पानगळ
फांद्यांचे हुंदके
ऐकू येत नाहीत !!

सरांचा वाढदिवस अन मुलांचे व्यवस्थापन !!

चौथीची मुलं म्हणजे अवघ्या ८-९ वर्षाचे वय. आपल्या भाषेत लहान मुलं. पण आपल्याला जितकी ही मुलं लहान वाटतात त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ही मुलं हुशार अन चौकस आहेत, असे नुकत्याच आलेल्या माझ्या अनुभवावरून सांगावेसे वाटते. अन हा अनुभव आहे सरांच्या वाढदिवसाचा. घोसाळी गावातील फ्रान्सीस सर नंदाखाल शाळेतील चौथीच्या मुलांचे स्कॉलरशिपचे क्लासेस घेतात. ते मुलांमध्ये इतके प्रिय आहेत कि मुलाना शाळेतून घरी आल्या आल्या स्कॉलरशिपच्या क्लासचे वेध लागतात. माझी मुलगी स्कॉलरशिपच्या क्लासला त्यांच्याकडे जाते. फ्रान्सिस सरांनी मुलांवर अशी काय जादू केली आहे की सर्व मुलांचा उत्साह जो क्लासच्या पहिल्या दिवशी होता, तो अजूनही टिकून आहे.

एक आठवड्या अगोदर माझी ९ वर्षाची मुलगी माझ्या कडे आली अन म्हणाली कि मला तुमची हेल्प पाहिजे. तिला विचारल्यावर मला कळाले कि त्यांच्या अतिप्रिय फ्रान्सिस सरांचा ३१ जानेवारीला वाढदिवस असून मुलांनी त्यांना काहीही कल्पना न देता शाळेच्या दिवशी म्हणजे ३० जानेवारीला क्लासच्या वेळेत वर्गात वाढदिवस साजरा करून सरांना सरप्राइज देण्याचे ठरवले आहे. मी तिला खर्चाचे विचारले तेव्हा असे समजले कि प्रत्येक मुलांनी प्रत्येकी ५० रुपये कंट्रीब्युशन काढून जमलेल्या पैशातून केक, कोल्ड ड्रिंक आणि सरांना गिफ्ट आणण्याचे ठरवले आहे. केक आणण्याची जबाबदारी एकीने, कोल्ड ड्रिंकची जबाबदारी दुसरीने अन गिफ्टची जबाबदारी माझ्या मुलीने असे कामांचे वाटपही झाल्याचे तिने मला सांगितले. माझ्या मुलीने सरांच्या गिफ्टची जबाबदारी घेतल्याने अप्रत्यक्षरीत्या ती जबाबदारी माझ्याकडे आली होती. तिची फिरकी घ्यावी म्हणून मी तिला माझ्याकडे पैसे दिल्याशिवाय मी गिफ्ट विकत आणणार नाही अशी गुगली टाकली तर माझ्या लेकीने तिच्याकडे जमा झालेले ७०० रुपये आणून दाखवून मला क्लीन बोल्ड केले. माझ्या लेकीकडे 'खजिनदाराची अतिरिक्त जबाबदारी' आल्याचे तेव्हा माझ्या ध्यानात आले. सरांना गिफ्ट म्हणून एक फ्लॉवर पॉट व त्यात ठेवण्यासाठी फुले अन एक शर्टचे कापड देण्याचे त्या मुलांमध्ये ठरल्याचे तिने दुसऱ्या दिवशी मला सांगितले. सरांच्या वाढदिवसाला १ आठवड्याचा अवधी असल्याने आपण २-३ दिवसांनी बोळींज नाक्यावर जाऊन गिफ्ट खरेदी करू असे मी तिला आश्वासन दिले अन तिचा रोजचा तगादा मिटवला.

दुसऱ्या दिवशी कामावरून आल्यानंतर माझ्या लेकीने मला नाराजीच्या सुरात एक वाईट बातमी सांगितली. आयोजन कमिटीत बेबनाव होऊन फुट पडली होती अन फुटलेल्या ग्रुपला वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करायचा होता. मला त्या वेळेला विधानसभा निवडणुकीची आठवण आली. ह्या कोवळ्या मुलांमध्ये सुद्धा 'राजकारण' शिरले नसेल ना अशी मला शंका आली. आता २ केक, २ गिफ्ट वर्गात येणार असे चित्र माझ्या डोळ्यासमोर तेव्हा उभे राहिले. तुम्ही एकत्र येवून वाढदिवस साजरा केला तर तो मोठा अन चांगला होईल असे मी तिला सुचविले अन विषय सोडून दिला. नंतर ठरल्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी कामावरून आल्यावर मी माझ्या मुलीला बोळींज नाक्यावर नेऊन सरांसाठी गिफ्ट म्हणून एक फ्लॉवर पॉट, त्यात ठेवण्यासाठी फुले अन एक शर्टचे कापड खरेदी केले अन व्यवस्थित बॉक्स मध्ये सुंदर वेष्टनात टाकून तिच्या हातात दिले. सरांना कोणता रंग चांगला दिसेल हे मुलांनी अगोदरच ठरवल्याने शर्टपीस घेताना निळ्या रंगाच्या कापडावर शिक्कामोर्तब करण्यास मला जास्त वेळ लागला नाही.

शुक्रवारी सरांचा वाढदिवस साजरा करावयाचा होता. क्लासची नेहमीची वेळ ३.३० ची परंतु त्या दिवशी माझी मुलगी अन इतर ४-५ मुली ह्या घरून लवकर क्लासला गेल्या अन त्यांनी क्लासमधील फळा शुभेच्छांनी रंगवून टाकला. ठरल्याप्रमाणे केक, कॉल्डड्रिंक, गिफ्ट ह्या सर्व वस्तू वर्गात पोहचल्या होत्या. सरांना सरप्राइज देण्याचे ठरले असल्याने ही योजना सरांना कळणार नाही ह्याची काळजी मुलांनी घेतली होती. आनंदाची गोष्ट म्हणजे दोन गटात बर्यापैकी समेट झाला होता. परंतु केकची ऑर्डर रिपीट झाल्याने वर्गात २ केक आणले गेले होते. ३.३० वाजता सरांनी वर्गात प्रवेश करताच सर्व मुलांनी उभे राहून जोरात 'Happy Birthday to you ' ह्या गीताने वर्ग डोक्यावर घेऊन सरांना शुभेच्छा दिल्या. सरांनी केक कापून मुलांसोबत वाढदिवस साजरा केला. दोन गटात समेट झाल्याने फंड वाढला होता. बर्थडे केक व्यतिरिक्त स्लाइज केक, कॉल्डड्रिंक, चोकलेट्स असा भरगच्च मेनू पार्टीकरिता तयार होता. मुलांनी सरांच्या भोवती एकाच गर्दी केली होती. जो तो सरांना वीश करण्यासाठी व गिफ्ट बॉक्समध्ये काय गिफ्ट आहे हे पाहण्यासाठी धावपळ करीत होता. आज क्लास असून धमाल होती. सर्व मुले सरांचा बर्थडे एन्जॉय करीत होती. लहान वाटणाऱ्या मुलांनी उत्तम टीम वर्क करून आपल्या प्रिय सरांचा वाढदिवस अविस्मरणीय असा साजरा केला होता. दुसऱ्या दिवशी सरांनी मुलांना वर्गात केक अन चॉकलेट्स वाटून मुलांना ट्रीट दिली अन मुलांना खुश केले.

सरांच्या सन्मानार्थ आयोजित वाढदिवसाच्या पार्टीमधून आपल्या ८-९ वर्षाच्या मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारे सरांविषयी आदर, सांघिक भावना, निर्णय प्रक्रिया, उत्तम नियोजन अन आयोजन, निधी उभारणी, निधीचा विनियोग, जबाबदारीचे वाटप, पालकांचे सहकार्य, योजनेची गुप्तता, मतभेदानंतर समेट, वेळेचे नियोजन अशा अनेक व्यवस्थापनातील नेतृत्वगुणांचा आविष्कार दाखवून दिला होता. हीच मुले आपल्या समाजाची भविष्य आहेत, अशा मुलांना योग्य मार्गदर्शन अन दिशा दिल्यास येणाऱ्या काळात आपले अस्तित्व पुसले न जाऊन अधिक ठळकपणे पुढे येईल ह्याची मला खात्री वाटते.

Thursday, January 22, 2015

एक दुर्दैवी शाळा


मुलगी वंशाचा दिवा होऊ शकत नाही का?

मुलगी वंशाचा दिवा होऊ शकत नाही का?

---------------------- सचिन मेंडिस

आपला समाज सुशिक्षित अन प्रगत समजला जातो तरीही अजूनही काही कुटुंबात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा अशी मागास विचारसरणी मूळ धरून आहे. अजूनही काही कुटुंबात मुलगी जन्माला आल्यास मुलगा जन्माला आल्यापेक्षा कमी आनंदाचे वातावरण असते. अलीकडे माझ्या मित्राला जेव्हा दुसरी मुलगी झाली तेव्हा काही मंडळीनी 'असू दे, नाराज होऊ नको' असे म्हणून एकप्रकारे त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा संतापून त्याने त्यांना सुनावले होते की 'तुमच्या घरी तुमच्या मुली जर तुम्हाला ओझे झाल्या असतील तर मला आणून द्या, मी त्यांना वाढवतो'. दुसरी गोष्ट म्हणजे चौकोनी कुटुंबाची रचना असलेल्या आपल्या समाजात २ मुली जन्माला आल्यावर काही लोकांनी आधुनिक पद्धतीने नव्या खेपेस १००% मुलगाच होणार, असे थोतांड मांडणाऱ्या डॉक्टरांचे पाय धरल्याची अनेक उदाहरणे आज आहेत. अपत्यांची संख्या हा एखाद्या कुटुंबाचा खाजगी विषय आहे अन त्यावर आक्षेप घेणे चुकीचे ठरेल, परंतु २ गोंडस अन निष्पाप मुलीच्या जन्माने समाधान न झालेल्या व फक्त पुत्रप्राप्तीसाठी धावपळ करणाऱ्या सुशिक्षित पालकांविषयी काय बोलावे? त्यांची कीव करावीशी वाटते. जर अशा पालकांना २ अपत्यापैकी एक मुलगा असला असता तर मुलगी हवी म्हणून तिसऱ्या अपत्याला जन्म दिला असता का? फक्त पुत्रप्राप्तीसाठी तिसरे अपत्य घेणारे पालक एकप्रकारे देवाने ज्या २ गोंडस मुली दिल्या आहेत, त्या देणगीचा अपमान करीत नाहीत काय?

आपल्या पुरोगामी समाजात अजूनही 'मुलगा हवा' म्हणून बऱ्याच कुटुंबात इच्छा नसताना सासू सासरे, आई वडील अन काही वेळेला नवरे मंडळी मुलींच्या आईवर नवे मातृत्व लादतात. आपल्या स्वातंत्र्याची गळचेपी होऊनही कुटुंबाच्या विरोधात जाण्याचे धाडस अशा महिला दाखवू शकत नाही. जिथे कुटुंबच विरोधात असते तिथे अशा महिलांना पाठींबा देण्यासाठी बाहेरचे कोण पुढे येणार? मग अशा महिलांना 'मुलगा झाला नाही तर?' ह्या विचारात ९ महिने गरोदरपण काढावे लागते. ह्यात तिला होणारया शारीरिक अन मानसिक वेदना 'मुलगा हवा' ह्या खोट्या अपेक्षेत कुटुंबाकडून दुर्लक्षित केल्या जातात. अन हे सर्व करून जर त्या महिलेला 'तिसरी मुलगी' झाली तर तिच्या अन त्या निष्पाप बालिकेच्या वाट्याला येणारी अवहेलना तर शब्दात मांडता न येणारी. 'वंशाला दिवे हवे' ह्या खोट्या हव्यासात अजूनही जगणार्यांनी आपल्या आजूबाजूला काही मुलांनी त्यांच्या पालकांच्या म्हातारपणात काय 'दिवे' लावले आहेत, हे जरा डोळे उघडून पाहावे. बरयाच कुटुंबात तर सासरी गेलेल्या मुलीचं आपल्या म्हाताऱ्या पालकांची सेवा करताना दिसतात. अशी उदाहरणे बोटावर मोजण्या इतकी जरूर असतील, पण त्यामुळे त्या महिलांची घुसमट लपवून ठेवायला हवी, असे नव्हे.काल एका महिलेची घुसमट परिचितांकडून कानावर आली म्हणून हा लेखप्रपंच. अजून बऱ्याच जणांची दु:खे 'वंशाच्या दिव्या' खाली गाढून गेलेली असतील.

जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी !!

जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी !!
----------------------------------------------
सचिन मेंडिस

आपल्या समाजात घात होऊन एखाद्या व्यक्तीचे जेव्हा अकाली निधन होते तेव्हा सगळा समाज शोकसागरात बुडून जातो. त्यात जर मृत झालेली व्यक्ती तरुण असेल किव्हा कुटुंबातील एकटी कमावती व्यक्ती असेल, तर फार हळहळ व्यक्त केली जाते. अशा व्यक्तीच्या अंत्ययात्रेला हजारोने लोक जमा होऊन त्या कुटुंबाना धीर देण्याचा प्रयत्न करतात अन सहानभूती व्यक्त करतात. जर ते दुर्दैवी कुटुंब अन त्यांचे नातेवाईक सधन असतील तर त्या कुटुंबाचे पुढे हाल होत नाहीत, परंतु जर त्या दुर्दैवी कुटुंबाची परिस्थिती बेताची असेल तर त्यांचे पुढील आयुष्य अंधकारमय होते. मग एक समाज म्हणून अशा अभागी कुटुंबाकरिता व्यक्त केलेली एक दिवसाची सहानभूती बेगडी ठरते. आपली हळहळ अन ढाळलेले अश्रू काळाच्या ओघात सुकून जातात. अशी दुर्दैवी कुटुंबे लोकाच्या लाजेखातर मदतीसाठी हात पुढे करीत नाहीत अन अनेकदा त्या कुटुंबातील मुलांची शिक्षणे पूर्ण होत नाहीत. पुढे अशी कुटुंबे आर्थिक चक्रव्युहात अशी सापडली जातात कि अनेक पिढ्या त्या शापातून वर येत नाहीत. समाज म्हणून आपणही आपल्या व्यापात इतके व्यस्त अन धावत असतो, की अशा दुर्दैवी कुटुंबाचे प्राक्तन आपल्या कानापर्यंत पोहचत नाही. मागच्या वर्षी अशाच एक कुटुंबाचा अनुभव मी इथे कथन केला होता. पैशाअभावी कॉलेज सोडण्याच्या तयारीत असलेल्या एका अनाथ मुलीची व्यथा मी SVS कडे मांडली होती. सुदैवाने आपल्या सर्वांनी मदतीचा हात देऊन त्या कुटुंबाला आधार दिला अन त्या मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यात आपल्याला यश आले.

ह्या विषयाच्या अनुषंगाने मला इथे एक उदारहण द्यायला आवडेल. काही वर्षापूर्वी मी एका मोठ्या फार्मा कंपनीत नोकरीला होता. दुर्दैवाने आमच्या डिविजनमधील एका कनिष्ट स्थरावरील तरुण सहकाऱ्याचा हार्ट फेल झाल्याने मृत्यू ओढवला. दुसऱ्या दिवशी आमच्या डिविजनमधील वरिष्ठ अधिकाऱ्या सोबत मला त्या मृत सहकाऱ्याच्या घरी जाण्याचा योग आला. एका छोट्याशा खोलीत विधवा आई, अशिक्षित पत्नी अन २ लहान मुले असा त्यांचा संसार होता. आमच्या डिविजनमधील सर्वांनी त्या अभागी कुटुंबियांची भेट घेऊन शोक व्यक्त केला अन काही वेळाने आम्ही त्यांच्या खोलीच्या बाहेर पडलो. त्या अभागी कुटुंबियांची परिस्थिती पाहून मी अस्वस्थ झालो होतो. एक दिवसाच्या सहानभूतीपलीकडे त्या अनाथ मुलांची गरज होती, जी पूर्ण होणे गरजेचे होते. मी आमच्या डिविजनच्या हेडला विचारले 'पुढे काय', आपली जबाबदारी संपली का? आपण ह्यांना वाऱ्यावर सोडायचे काय? एक सहकारी म्हणून आपल्याला कोरड्या सहानभूतीपलीकडे त्यांच्यासाठी काहीतरी करावे लागेल, आपण एक दिवसाचा पगार तरी त्यांना द्यायला हवा'. मी सगळ एका दमात त्यांच्यासमोर बोलून टाकलं. मग आमच्या डिविजनच्या हेडने पुढाकार घेऊन HR मार्फत त्या कुटुंबासाठी एक दिवसाचा पगार स्वेच्छेने देण्याचे आवाहन केले अन सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. २-३ वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी तर पूर्ण महिन्याचा पगार दिल्याचे मला कळाले. एक महिन्या नंतर जमा झालेल्या मदतीचा आकडा ऐकून मी अचंबित झालो. सुमारे ३२ लाख रुपये मदत गोळा झाली होती. आमच्या कंपनीने तो निधी एकदाच त्या कुटुंबाकडे न देता HR कडे ठेऊन घेतला अन त्या मृत व्यक्तीचा महिन्याचा पगार त्या कुटुंबाकडे पोहचण्याची व्यवस्था केली. त्याचप्रमाणे मुलांच्या शाळेची फी परस्पर शाळेत भरण्याची जबाबदारी HR Manager कडे सोपवली. एका छोट्या पुढाकाराने एक कुटुंब आर्थिक विवंचनेच्या शापातून बाहेर पडलं होत. मला मिळालेले समाधान तर अनमोल होते, जे आजही कित्येक वर्षांनी मी अनुभवत आहे.

आज समाज म्हणून आपण फुलं न फुलाची पाकळी एकटी कमावती व्यक्ती मृत पावलेल्या कुटुंबाना मदत केली, तर ज्या मृत व्यक्तीच्या अकाली निधनाने आपण जी हळहळ व्यक्त केली असेल, तर त्यांना आपली ती खरी श्रद्धांजली ठरेल. ही मदत फक्त आर्थिक असावी असे नाही. कुटुंबातील कुणाला आपण नोकरीसाठी/व्यवसायासाठी जरी मदत केली तरीही खूप फरक पडू शकतो. फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या गाव परिसराचा कानोसा घ्यावा लागेल. व्यक्तीच्या अकाली निधनानंतर अंत्यदर्शनासाठी होणारी गर्दी जेव्हा त्या अभागी कुटुंबाच्या मदतीसाठी तितक्याच गर्दीने पुढे येईल, तेव्हा आपल्या अश्रुची खरी फुले झालेली असतील. आपला समाज भावनिक आहे. अभागी अन दुर्दैवी कुटुंबियांच्या मदतीकरिता तो नेहमीच तयार असतो. गरज आहे ती आपल्या सर्वांच्या पुढाकाराची. मदतीचे हात दुर्दैवी कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी.

(विमा टर्म पॉलिसीबाबतीत आपल्या समाजात पाहिजे तितकी जागरूकता आलेली नाही, कुटुंबातील कमावत्या व्यक्तींनी अशी टर्म पॉलिसी घेतल्यास समाजाच्या पुढे न येणारे बरेच प्रश्न सुटू शकतील, असे मला वाटते.)

सचिन मेंडिस

कुपारी इतिहासातील भुते !!

कुपारी इतिहासातील भुते !!

का कुणास ठाऊक पण 'भूत' ह्या विषयावर ऐकण्यात व बोलण्यात खूप उत्सुकता अन मजा वाटते. त्यातल्या त्यात आपल्या गावातील भूतकथेमध्ये 'धोतीन' अन 'हेड्लन' हि दोन महत्वाची पात्रे ऐकण्यात आली आहेत. 'हेड्लन' विषयी मी माझ्या आजीकडून बरंच ऐकून होतो. वाडीतल्या बावखालावर असलेल्या चिंचेच्या झाडावर ती रात्री बसलेली असायची, असे आजी सांगत असे. तिचे वर्णन पण किती भयानक. सफेद रंग, केस मोकळे सोडलेले अन उलटे पाय. आजी म्हण्यायची कि रात्री हेड्लन हातातल्या बांगड्या वाजवत असे व विचित्र हसत असे. चुकून कुणी रात्री वाडीत गेले अन तिच्या तावडीत सापडले तर ती त्यांच्या मानगुटीवर बसून अख्खी रात्र त्याला वाडीत पिटाळत असे. पुढे शाळेत गेल्यावर 'हडळ' ही आजीने सांगितलेल्या 'हेड्लन'च मराठीय रूप असल्याचं लक्षात आलं. हिंदी चित्रपटात कमी कपड्यात नाचणारी 'हेलन' ही अभिनेत्री नाम साधर्म्या मुळे हेड्लनची नातेवाईक असावी असा लहानपणी माझा गैरसमज होता, तो नंतर दूर झाला.

भूतकथेमधील पुरुषी पात्र म्हणजे 'धोतीन'. आजीने वर्णन केल्याप्रमाणे उंचपुरे, सफेद कपडे परिधान केलेले 'धोतीन' रात्री घोड्यावरून गावात फिरत असतं. रात्री अपरात्री गावात कुणी रस्त्यावर आढळल्यास ते त्यांची मानगूट पकडून खेचून नेत असतं. मग अशी गावातून गायब झालेली व्यक्ती आजूबाजूच्या गावात कुठेतरी पेंढ्याच्या भारयात पडलेली सापडत असे. असेही म्हणतात कि 'धोतीन' मंडळी आपल्या हातात असलेल्या चाबकाने पाठीवर त्याला फटके देत असे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार 'धोतीन' हे दुसरे तिसरे कुणी नसून त्या काळी रात्री गस्त घालणारे इंग्रज अधिकारी होते. अपरात्री दारू पिऊन रस्त्यात जोराने गाणी गाणाऱ्या आपल्या पूर्वजांना ते उचलून फटके देत असतं. खरे काय ते त्यांनाच माहित.

आम्ही लहान असताना धाक म्हणून वडीलधारी मंडळी अमूक ठिकाणी हेड्लन 'उतरते' असे सांगत असतं. ह्यात 'उतरणे' ह्या शब्दाचा मला कळलेला अर्थ म्हणजे 'अदृश्य स्वरूपातून दृश्य स्वरूपात येणे'. लहानपणी काही टवाळखोर मुले अमुक ठिकाणी आम्ही झाडावर हेड्लन पाहिली असे खोटे दावे करून भूतकथेत 'हेड्लन' रंगवत असतं. तिच्या बांगड्याचा 'छान छान' आवाज, सफेद मोकळे केस अन बाहेर आलेली जीभ असे वर्णन ऐकून छोट्या मुलांची बोबडी वळत असे. विशेष म्हणजे भूत विषयात भीती असूनही भूतकथा ऐकण्यात सगळ्यांना रुची असायची. मग कधी ओट्यावर बसून गोष्टी ऐकताना कुणी वात्रट मुलगा 'हेड्लन आली हेड्लन आली' असे ओरडून घरात पळत असे अन मग जी धावपळ उडायची ती शब्दात मांडणे कठीण. आधुनिक काळात अशा गोष्टी कुणी मानत नाही अन मानूही नये. फक्त नवीन पिढीला ह्याची माहिती व्हावी म्हणून ह्या चार ओळी.

मूर्तीपूजा करू नकोस !!

मूर्तीपूजा करू नकोस !!
-------------------------------- सचिन मेंडिस

काल फेसबुक चाळत असताना आदरणीय फादर Francis D'Britto ह्यांची खालील पोस्ट वाचनात आली.

"समाजात मूर्तीपूजा वाढत चालली आहे का? जो उठतो तो स्व:ताचे, आपल्या बायकोचे फोटो पोस्ट करीत आहे. काही फोटो इतके रोमांटिक असतात कि ते केवळ दोघांच्याच नजरेसाठी असतात. तुम्हाला काय वाटते?"

फादरांनी इथे २ मुद्दे उपस्थित केलेले आहेत.

१) समाजात मूर्तीपूजा वाढत चालली आहे का? जो उठतो तो स्वताचे, आपल्या बायकोचे फोटो पोस्ट करीत आहे.

२) काही फोटो इतके रोमांटिक असतात, कि ते केवळ दोघांच्याच नजरेसाठी असतात.

ह्यातील दुसऱ्या मुद्द्यावर आक्षेप घेता येऊ शकतो तरीही 'रोमांटिक' हि संकल्पना हि व्यक्तीसापेक्ष असल्याने प्रत्येकाच्या नजरेतून त्याची व्याख्या अन भावार्थ हे वेगळे असू शकतात. 'रोमांटिक' अन 'अश्लील' ह्यात अस्पष्टता जरी असली तरी मुलभूत फरक नक्कीच आहे. फेसबुकवर काही अपवाद वगळले तर फोटो अपलोड करणाऱ्या व्यक्ती ते तारतम्य पाळतात, असे मला वाटते. बाकी फेक अकौंटवरून पोस्ट होत असलेल्या वादग्रस्त फोटोवर चर्चा करणे अयोग्य ठरेल.

आता सविस्तरपणे पहिल्या मुद्द्याविषयी,

समाजात मूर्तीपूजा वाढत चालली आहे का? हा प्रश्न खरे तर धर्मगुरुकडून अपेक्षित नव्हता. खरतरं समाजात फार पूर्वीपासून मूर्तीपूजा चालत आलेली असून धर्मव्यवस्थेने अप्रत्यक्षपणे ह्या मूर्तीपूजेला व्यासपीठ अन धार्मिक अधिष्टान प्राप्त करून दिले आहे. आजपर्यंत चर्च व्यवस्थेत कोणत्याही धर्मगुरूंनी पुढाकार घेऊन 'मूर्तीपूजा' म्हणजे काय? आणि 'एकाच देवाला भज, मूर्तीपूजा करू नकोस' ह्या पहिल्या आज्ञेतील परमेश्वराला 'नको असलेली' मूर्तीपूजा कोणती ह्याचा स्पष्ट उल्लेख अन निराकरण केलेले नाही. आज प्रत्येक धर्मात 'मूर्तीपूजा' हा आराधनेचा मुख्य पाया बनलेला आहे अन दुर्दैवाने ज्या ख्रिस्ती श्रद्धेत परमोच्च असलेल्या दहा आज्ञेत 'मूर्तीपूजा करू नकोस' असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे, त्या चर्च व्यवस्थेत सुद्धा उघडपणे मूर्तीपूजा केली जाते अन ती थांबविण्याऐवजी मूर्तीभोवती गर्दी जमविण्यासाठी कार्यक्रम आखले जातात.

दुसरा मुद्दा म्हणजे फादरांनी चर्चेत घेतलेली फेसबुकवरील 'फोटो अपलोड मूर्तीपूजा'. मुळात फेसबुक हे मुक्त व्यासपीठ आहे. आपल्या जीवनात घडणारया गोष्टी लोकांना सांगणे अन दुसरयांच्या आयुष्यात काय चालले आहे ह्यांचा कानोसा घेणे हा फेसबुकच्या यशाचा फोर्मूला आहे. दुसऱ्याच्या खाजगी जीवनाबद्दल असलेली कुतुहुलता अन आपली 'सुवार्ता' लोकांपार्यात पोहचवून त्यातून मिरवण्याची हौस हे मानवी स्वभावाचे भाग आहेत. वरकरणी हे सर्व प्रकार उथळ जरी वाटत असले, तरी बदलत्या परिस्थितीत अप्रत्यक्षपणे हे सोशल जीवनाचे भाग बनले आहेत. आज देशविदेशातील अनेक विद्वान, बुद्धिमान, पुरस्कारविजेत्या मोठ्या महनीय व्यक्तीनी 'सोशल मिडिया'ला आपले केले आहे. लोकांनी निवडून दिलेले लोकशाही सरकार देखील ह्या बाबतीत मागे नाही.

फादर फ्रान्सीस दिब्रिटो ह्यांच्या पोस्टला प्रतिक्रिया देताना अनेक व्यक्तींनी 'सुवार्ता' मासिकाचा उल्लेख केलेला आहे. अनेकांच्या मते आज सुवार्ताचा आर्थिक कणा हा ह्या मासिकामध्ये ५०% पानात छापल्या जाणारया जाहिरातीवर अवलंबून आहे. ज्यातील बहुतेक पाने ही फोटोंनी भरलेली असतात. स्पष्ट सांगितले तर फोटो जाहिरात देऊन आपले सुख अन दुक्ख जगाला सांगण्याचा फेसबुकी प्रकार सुवार्ताद्वारे आज अनेक वर्ष चालू आहे. 'सुवार्ता'सारख्या दर्जेद्दार मासिकात ५०% पाने जाहिरातीसाठी देणे हा खरे तर चर्चेचा स्वतंत्र विषय आहे पण फादरांनी मांडलेल्या मुद्द्याला सुवार्ता मासिक अगदी जवळून निगडीत असल्याने त्याचा उल्लेख टाळणे, हे सुवार्तावर अन्याय केल्यासारखे होईल. मागच्या महिन्यात सकाळ ह्या वृत्तपत्रात वसईतील लेखक स्टॅन्ली गोन्साल्वीस ह्यांनी जुने गोवे येथे पार पडलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर ह्यांच्या शवदर्शनावर 'शवदर्शन कि प्रदर्शन' असा ख्रिस्ती धार्मिक व्यवस्थेला प्रश्न विचारणारा व शवदर्शन कसे चुकीचे व मूर्तीपूजेला प्रोत्साहन देणारे आहे, असा उहापोह करणारा लेख लिहला होता. त्यावर विरोधी प्रतिक्रिया उमटल्याचे ऐकिवात नाही.

अलीकडे 'पिके' सारख्या चित्रपटाने 'मूर्तीपूजा' ह्या विषयावर मार्मिक भाष्य करून भोळ्या भाबड्या लोकांच्या श्रद्धेला हात घालून आर्थिक प्राप्ती करणाऱ्या धार्मिक व्यवस्थेवर ताशेरे ओढले होते. लोकांनाही हा विषय भावल्याने त्याला प्रचंड प्रतिसाद दिला होता. आज खरे पाहिले तर धर्मव्यवस्थेतून मूर्तीपूजा दूर करून लोकांना 'धर्मशास्त्रातून नितीशास्त्राकडे' नेण्याची गरज आहे. आजच्या युगात मोठी महागडी मंदिरे, देवांच्या मुर्त्यांची स्थापना, मूर्त्यांना नैवद्य, देवांची मिरवणूक, मूर्त्यांच्या दर्शनासाठी २४ तास रांगा व रांगेतून मुक्तीसाठी वशिलेबाजी ह्या सर्व भौतिक पुजेअर्चेवर मुक्तपणे चर्चा घडवून आणण्याची गरज आहे. 'पिके'च्या निम्मिताने ती जरी घराघरात सुरु झाली असली तरी ती चित्रपटापुरता सीमित न राहता 'विषयावर' झाली पाहिजे. आजकाल प्रवाहाविरुद्ध लिहिणे अन तेही धार्मिक विषयावर लिहिणे हे 'धर्माविरुद्ध' समजले जाते. सहसा अशा विचाराला जाहीरपणे समर्थन करण्याच्या फंदात कुणी पडत नाही. अशा विषयावरचे विचार मनात दाबून ठेवून घुसमट वाढवण्यापेक्षा व्यक्त केले तर हलके वाटते. फादरांच्या पोस्टने ही संधी दिली म्हणून बरे वाटले, त्यांनी माडलेली चर्चा थोडी पुढे नेऊन नव्या पिढीचे मुर्तीपुजेबद्दल असलेले एकूणच मत चर्चेत घेण्याचा हा एक प्रयत्न आहे.

Wednesday, January 7, 2015

आमची माती !!



आमची माती !!

---------------------- सचिन  मेंडिस 

मातीवर लिहावं असं का वाटल ते सांगता येणार नाही, पण 'माती' नव्या लेखासाठी सुपीक विषय ठरेल अशी खात्री होती. शेतीबाबतीत मी अज्ञानी असल्याने त्या दृष्टीने मातीवर लिहिण्यास मला मर्यादा आहेत पण 'माती' ह्या विषयावर दोन पान ललित अगदी आपुलकीने लिहिता येईल हे नक्की.

अगदी बालपणापासून ह्या मातीशी आपल नांत जुळलेलं आहे. लहानपणी शेणाने सारवलेल्या ओट्यापासून ते मातीने फुललेल्या अंगणापर्यंत मातीशी आपली गट्टी आहे. कित्येक वेळा खेळता खेळता मातीचे - घास सहज तोंडात टाकायला आपण मागे पुढे पाहिले नाही. तेव्हा माती तोंडात घातली तरी कुणी ओरडत नव्हते. आता चुकून लहान मुलाने तोंडात माती घातली तर नव्या पिढीची मम्मी त्याला दरडावून 'डर्टी बॉय' म्हणत डोळे वटारते. कसं समजवायचं तिला कि ज्याचे मातीशी नाते तुटते त्याचे आईशी नाते तुटायला वेळ लागत नाही.

त्या काळी बहुतेकांची पोटे शेतीवर अवलंबून असल्याने मातीत घाम गाळल्याशिवाय घरात चूल पेटत नसे. त्यामुळे प्रत्येक घरात मातीला मान होता. शेती श्रेष्ठ अन नोकरी कनिष्ट समजत असलेला आपला समाज शिक्षणाने बदलला अन नोकरी समोर शेती मागे पडली अन त्यामुळे मातीत राबणारे हात पुढे पेनाबरोबर राबणारे   आताच्या आधुनिक काळात हायटेक होऊन मातीपासून दुरावले. (सध्या महापालिकेने ठिकठिकाणी खोदकाम करून आपल्याला मातीसंगे प्रवास करण्याची आगळी संधी दिली आहे, असे म्हणता येईल).

शाळेत जीवशास्त्र हा विषय होता, जो आपला जीव काढत असे. त्यात मातीचे अनेक प्रकार दिले होते. पण गावात विहीर खोदताना चुकून लागलेल्या 'चिकणमाती' शिवाय मला दुसऱ्या मातीत गोडी नव्हती. तेव्हा दूरदर्शनवर मराठी चित्रपट दाखवण्याअगोदर 'आमची माती आमची माणस' हा कार्यक्रम दाखवला जाई, जो नाईलाजाने पाहावा लागे. आज त्या मातीला सोन्याचा भाव आला अन दुर्दैवाने आमची आमची म्हणावी अशी माणस परकी ठरली. त्यात मातीचा दोष तो काय. अडाणी पूर्वजांनी छातीची माती करून जमीन ठेवली अन सुशिक्षित नवीन पिढीने ती जागेला लावली. कधी कधी वाटते ह्या काळ्या आईला सातबाराच्या उताऱ्यावर आणून आपण फार मोठे पाप केले आहे. ना ती स्वतंत्र आहे ना आपले जीव शांत.

'काळ्या मातीत मातीत, तिफण चालती' हे माझे आवडते मराठी गाणं. हे गीत ऐकताना मन इतके मातीत विरघळून जाते कि आठवणीच्या पुस्तकात लपून ठेवलेली शेतातील नांगरणी डोळ्यासमोर धावते. मातीचा गंध हा तर लिहिण्यासाठी स्वतंत्र विषय ठरू शकेल. पहिल्या पावसातील मातीचा सुगंध श्वासावाटे हृदयात घेतल्याशिवाय खरा पावसाळा मनात डोकावताच नाही. इतका तो मातीचा सुगंध हवाहवासा, घरात असूनही ओलाचिंब करणारा.

मातीचा खरा महिमा कळून येतो तो एखाद्याच्या अंतयात्रेवेळी. 'माती असशी मातीस मिळशी, मनुजा आठव तू येशी' हे गीत जेव्हा कानावर पडते तेव्हा क्षणभर सुन्न व्हायला होते. आपण मातीपासून बनलेलो असून एक दिवस ह्या मातीत विलीन होणार आहोत हि भावना क्षणात प्रत्येकाला भौतिक जगातून जागी करते. स्पर्धेच्या युगात मागे पाहता धावत असताना एक दिवस पुढे जाऊन  माती व्हावे लागणार आहे, हे सत्य पचवायला किती कठीणशेवटी तेच अंतिम  सत्य. पायाखाली सतत मातीला तुडवत ऐटीत चालणाऱ्या मानवासाठी संत कबीरांनी फार सुंदर लिहून ठेवलं आहे, ते लिहितात,

माटी कँहे कुंभारसे। तु क्या रोंदे मोहे।।
एक दिन ऐसा आयेगा। मै रौंदूंगी तोहे।।

आजच्या काळात 'मातीशी बेईमानी' वाढत असताना असे वाटते कि ते दिवस दूर नाहीत, जेव्हा काळी आई आपल्याला जाब विचारायला मागे पुढे पाहणार नाही. ती जेव्हा जाब विचारते तेव्हा दुर्दैवाने एखादा माळीण गाव तिच्या पोटात गेलेला असतो, कायमचा. फक्त आपल्याला त्यातून काही तरी शिकायला हवं.

उब हाताला मातीची अन सुगंध श्वासाला मातीचा  !
ओळख देहाला मातीची अन निरोप अखेर ह्या मातीचा  !