Tuesday, June 10, 2014

आपल्यात वाद नको .




सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने फेसबुकच्या ह्या व्यासपीठावर वेगवेगळी मते व वयक्तिक शेरेबाजी निदर्शनास येत आहे. आपण सर्व सुशिक्षित अन हक्काच्या बाबतीत जागरूक असल्यामुळे आपल्या सर्वाचे एक विशिष्ट राजकीय मत आहे अन सर्वांनी एकमेकांच्या मताचा आदर राखला पाहिजे, असे मला वाटते.

भिन्न राजकीय विचारसरणीचे लोक वेगवेगळ्या उमेदवाराच्या समर्थनार्थ लिखाण करीत असतना काही वेळेला वयक्तिक दोषारोप करतात, जे योग्य नाही. काही मूठभर लाभार्थी सोडले तर आपल्या समाजाचा मुख्य शत्रू कोण आहे, हे आपल्या सर्वास ठाऊक आहे, त्यामुळे आपापसात मतभेद करून आपली शक्ती अन एकता व्यर्थ घालण्यापेक्षा ह्या निवडणुकीचा फायदा घेऊन आपल्या शत्रूला कसे चारी मुंड्या चित करू शकू ह्या दिशेने आपण प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे.

निवडणुका येतात अन जातात परंतु गाव पातळीवर निर्माण झालेले मतभेद उगाच पुढे कटुता निर्माण करतात व आपल्या ऐक्यास बाधा आणतात. आपण 'कुपारी' म्हणून एक कुटुंब आहोत अन अडी-अडचणीला 'एक कुपारी समाज' म्हणून एकमेकांना मदत करीत आलेलो आहोत व भविष्यातहि आपल्या गावात आपणच एकमेकांच्या अडचणीत एकमेकांचे सोबती राहणार आहोत. उद्या गावात एखादा तातडीचा प्रसंग निर्माण झाल्यास पहिला मदतीला धावून येणारा आपला 'कुपारी शेजारी' असेल, आपल्यासाठी दिल्लीहून सोनिया, मोदी, केजरीवाल अन बळीराम येणार नाहीत हे ध्यानात ठेवा. गरज नसताना एकमेकावर होणारी वयक्तिक चिखलफेक टाळून आपण येणाऱ्या काळात 'एक कुपारी कुटुंब' म्हणून एकत्र राहिले पाहिजे अन आपल्या मुख्य शत्रूच्या विरोधात मतदान करण्यसाठी सज्ज झाले पाहिजे.

सचिन मेंडीस

No comments: