Wednesday, February 19, 2014

ओढ घराची....!!


ओढ घराची....!!

मावळती झाली कि मुंबई मध्ये असलेला जीव घरच्या ओढीने कासावीस होतो. मुंबई तशी मायावी नगरी, स्वप्ने दाखवणारी अन ती फुलवणारी पण आपल्याला बुवा संध्याकाळ झाली कि परतीचे वेध लागतात.

मग जी मिळेल ती गाडी त्यात कोंबून मन परतीच्या वाटेला लागते. भाईंदर सोडले अन वसईच्या खाडीवरून गाडी विरार दिशेने निघाली कि वातावरणातील बदल जाणवू लागतो. वसईच्या हवेचा गारवा अन डोळ्याला दिसणारा निसर्गरम्य परिसर गर्दीत गुदमरलेल्या जीवाला स्वर्गीय आनंद देतो.

मन विचार करते काय जादू आहे ह्या वसईची, माझ्या तुमच्या गावाची, आपली माती आपली माणसे किती ओढ लावतात. बिछान्यावर गेल्यावर खिडकीतून दिसणारा अन नारळाच्या झावळी मागे लपणारा चंद्र, पक्षांचा किलबिलाट अन मुलांना गोष्टी सांगताना येणारी ती सुखाची शांत झोप. किती अवर्णनीय...!!

काही अपरिहार्य कारणामुळे आपले भाऊबंद मुंबईला राहायला जरी गेलेले असले ,तरी त्यांचे डोळे शनिवार-रविवारची वाट पाहत असतात, आपल्या गावच्या मातीचा सुगंध घेण्यासाठी अन घरच्या लोकांच्या मायेची उब अनुभवण्यासाठी...!!

No comments: