Wednesday, February 19, 2014

नोकरी करणार्या स्त्रियां.


नोकरी करणार्या स्त्रियांसाठी घर अन ऑफीस ही एक तारेची कसरत असते. त्यात आपण मुंबई पासून दूर रहात असल्याने आपण जीवघेणा लोकलचा प्रवासा करावा लागतो. दूरचा प्रवास असल्याने सकाळी लवकर उठून डबा करणे हे ही वेगळे आव्हानच.निसर्गाने प्रजनन अन संगोपणाची जबाबदारी टाकली आहे ती तर वेगळीच, त्याला पर्याय नाही.

स्त्रीने नोकरी करावी की नाही हा तिचा अन त्यांच्या कुटुंबाचा खाजगी प्रश्न आहे. एखाद्या स्त्रीला अनंत अडचणीला तोंड देऊन जर नोकरी करावी लागत असेल तर तिने हा प्रश्न स्वताला विचारला पाहिजे, की खरच ही नोकरी करणे गरजेचे आहे का? आपण आपल्या गरजा मर्यादित ठेवून हा मनस्ताप कमी करू शकतो का?

माझ्या आईने घर सांभाळुन वडिलांच्या नोकरीवर आम्हा भावंडाना उत्तम रीतीने शिकविले अन वाढविले, आजच्या काळात बाजारातील चैनीच्या गरजामागे न धावता आपण हे करू शकू का, हा खरा प्रश्न आहे. मी अनेक तरुण मुली अशा बघितल्या आहेत की ज्यानी आपल्या घरासाठी चांगल्या नोकर्या सोडल्या आहेत. काही उदाहरणे अशी आहेत जिथे पत्नीला चांगली नोकरी असल्याने पती-पत्नीने आपल्या कामाच्या जबाबदारीची अदलाबदल केलेली आहे. ऐपत नसतानाही कर्ज काढून मोठी खरेदी करायची अन त्याचे हप्ते भरता भरता मेटाकुटीला यायचे हे खरच विचार करण्यासारखे आहे. ज्याचा त्याने विचार करावा.

जगण्यासाठी पैसे हवे असतात हे नक्की पण पैशाच्या गरजेला मर्यादा नसते. कुणाचा संसार १००००रु. मधे भागतो तर एखाद्याला लाख ही कमी पडतात. अधिक पैसे कमवण्यासाठी वेळ अन श्रम देणे कुणालाही चुकले नाही. रडून फक्त सहानभूती मिळू शकते, पण त्याने प्रश्न सुटत नाही.

No comments: